"शाहू महाराजांचा डीएनए असलेल्या प्रत्येक तरुणांनी त्यांच्या विचारांचा वसा घेऊन समाजाचा तसेच देशाचा विकास केला पाहिजे."असे मत नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चे मराठी विभाग प्रमुख डॉ.अरुण शिंदे यांनी कोल्हापूरचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती दिनी काढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांनी रयतेचे राज्य कसे असावे ते जनतेसाठी कसे चालवावे याचा आदर्श नमुना या दोन्ही राजांनी आपल्यासमोर घालून दिलेला आहे. लोकराजा शाहू महाराजांनी आयुष्यभर केलेले समाजसेवेचं काम विशेषतः समतेचा विचार जगभर पोचवण्यासाठी आपण कार्यरत राहूया हीच राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.एस.बन्ने होते. त्यांनी शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचा आढावा आपल्या भाषणात घेतला. शाहू जयंतीचे अवचित्य साधून विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री एम. आर. पाटील यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ए. एस. मगदूम यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. टी. एस. चौगुले यांनी केले.कार्यक्रमासाठी ज्युनिअर विभाग प्रमुख श्री बी.डी.डवंग, एम बी कांबळे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.